स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरु - मुख्यमंत्री

महाराष्ट्र
 06 Aug 2019  395


स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू: मुख्यमंत्री

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई ५ ऑगस्ट 

:  जम्मू आणि काश्मीरला स्वायत्तता देणारे भारतीय राज्यघटनेतील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयामुळे स्वातंत्र्याचे नवे पर्व सुरू झाले आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात म्हणाले की,  या निर्णयामुळे  खूप दीर्घकाळापासून पाहिलेले स्वप्न आता वास्तवात साकारले आहे. या घटनेचे वर्णन करणे  शब्द आणि भावनांपलीकडे असून या क्षणाची मला दीर्घकाळ प्रतीक्षा होती. महान नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी याच उद्देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते.

जम्मू आणि काश्मीरच्या एकात्मतेसोबत  विकासासाठीही हे अगदी अचूक पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न साकार झाले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नेशन फर्स्ट ही भावना कृतीत आणण्यासाठी दाखवलेल्या खंबीर नेतृत्वाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.