मुख्य सचिवांना कॉंग्रेसची नोटिस
महाराष्ट्र |
05 Aug 2019
526
|
मुंबई: गेल्या आठवडाभरापासून राज्यात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा बिकट प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री व राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले ना.देवेंद्र फडणवीस हे प्रचार यात्रा काढण्यात व्यस्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्याच्या मुख्यसचिवांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मुंबई कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
त्यानंतर नाना पटोले म्हणाले,
मुख्यमंत्री जनतेच्या पैशानी पंचतारांकीत जनादेश यात्रा करीत आहे. आम्ही
मुख्य सचिवांना नोटिस दिली
राज्यात सर्व आपदा असताना राज्यात आपदा घोषित करायला सरकार तयार नाही.अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे.या विरोधात वेळ पडल्यास 302चा गुन्हा दाखल करायला मागे पाहणार नाही असं ते म्हणाले.
३७० कलमावर बोलण्यास नाना पटोलेंचा नकार ते म्हणाले, आज काही राजकीय पक्ष पेढे वाटत आहे. संकटातील राज्यातील जनतेची त्यांना काळजी नाही.सीएम म्हणतात मोबाईल वरुण संपर्कात आहे..सरकार मोबाईल वर चालत का? असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला.