राज्यात शेतकरी हिताचाच कृषि कायदा

मुंबई
 02 Jul 2021  265

*राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार - 


लोकदूत वेबटीम 

मुंबई  २ जुलै

 केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे आणि तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. 


राज्यात कृषी कायदा होताना शेतकरी विरोधात कुठलाही कायदा होणार नाही ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. याबाबत शरद पवारसाहेबांनीही कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.