कोरोना निर्बंधात शिथिलता

विधिमंडळ
 03 Mar 2022  396

निम्मा महाराष्ट्र झाला कोरोना निर्बंध मुक्त
-१४ जिल्ह्यात नाट्यगृहे, थिएटर्स, रेस्तराँ पूर्ण क्षमतेने होणार सुरू

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 मार्च 


राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्या अनुषंगाने  राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये कोरोना च्या नियमांमधून बुधवारी अनेक शिथीलता देण्यात आल्या आहेत. नवे नियम ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

मागच्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होते आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नव्या गाईडलाईन्स  आज जारी केल्या आहेत.

१४ जिल्हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निकष तयार केले आहेत. त्या निकषांना ग्रुप ए असे नाव दिले आहे. ज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले 90 टक्के नागरिक, दुसरा डोस घेतलेले किमान 70 टक्के नागरिक, पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून कमी, रूग्णाला लागणारे बेड आणि ऑक्सिजन सपोर्ट बेड यांचे प्रमाण 40 टक्क्यांहून कमी असे चार निकष ज्या जिल्ह्यांना लागू पडतात त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले आहेत.

या निकषांमध्ये बसणाऱ्या जिल्ह्यांना ए ग्रुप मधले जिल्हे असे संबोधण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले चौदा जिल्हे आहेत जिथे सर्व क्षमतेने थिएटर्स, चित्रपटगृहं आणि रेस्तराँ सुरू होणार आहेत.
---------------
याला संमती ?
१. सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास संमती.
२. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास संमती.
३. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधकारक.
४. चित्रपटगृहं, मॉल्स या ठिकाणी प्रवेश करतानाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक.
५. मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्कही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची संमती.
६. लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार यावर असलेले विविध निर्बंधही हटवण्यास संमती.
-----------------------------------
14 जिल्हे कोणते?
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर.
-----------------------------------