अखेर मंत्रालयातील उपसचिव सहसचिवांच्या बदल्या
* बदल्यांत "कही ख़ुशी,कही गम"
* कालावधी होताच काहींच्या बदल्या तर काहींना अभय
* मंत्रालयात अन्य अधिकाऱ्यांच्या रंगली चर्चा
लोकदूत वेबटीम
मुंबई 1 सप्टेंबर
मंत्रालयातील महत्वाच्या विभागात ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी, अव्वर सचिव आणि उप सचिवांसह सह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुहूर्त मिळाला आहे. परंतु या बदल्यावरून मंत्रालयात "कही ख़ुशी कही गम" अशी परिस्थिती असून उपसचिव आणि सह सचिव दर्जाच्या ठरावीक अधिकाऱ्यांच्याच बदल्या केल्या आहे. तर काही अधिकाऱ्यांना मुदत होऊनही बदली केली नसल्याने या अधिकाऱ्यांना कोण आणि कशासाठी पाठीशी घालत आहे ? यावर नाराजी व्यक्त होत जोरदार खमंग चर्चा रंगली आहे.
बदली झालेल्या उप सचिव व सह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आदेश सोबत जोडले आहे. मात्र मलाईदार खात्यात काही अधिकारी बदली कालावधी पूर्ण होऊनही अद्याप त्यांची बदली झाली नसून यामागे मोठे मलाईदार गणित असल्याची चर्चा मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर रंगली असून यात विविध कंगोरे बाहेर येत आहे.