नारायण राणे -राज्यपाल भेट
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
* नारायण राणे यांची राज्यपालांकडे मागणी
लोकदूत वेबटीम
मुंबई 25 मे
कोरोनामुळे महाराष्ट्रातील(maharashtra) परिस्थिती हाताबाहेर जात आहे. राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून राज्यातील रुग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या. त्याच बरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे ( narayan rane) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsinh koshyari) यांच्याकडे केली आहे.
सोमवारी दुपारी राजभवन (rajbhavan)येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery)यांच्यावर हल्लाबोल करीत सराकर अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. मुंबईतील रुग्णालयाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे रुग्णालये लष्कराकडे सोपवावे अशी मागणी राज्यपालांकडे राणे यांनी केली. एकूणच कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करीत सरकार अपयशी ठरल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.