मुंबईत काम करणाऱ्या लोकांना उल्हासनगरात "नो एंट्री"

महाराष्ट्र
 05 May 2020  591

* उल्हासनगर मनपा आयुक्तांचा निर्णय 

लोकदूत वेबटीम 

उल्हासनगर 5 मे 

    उल्हासनगर मनपा क्षेत्रात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये मुंबईत काम करणाऱ्या लोकांची अधिक संख्या समोर आली आहे.त्यामुळेच उल्हासनगर मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईत कामासाठी जात येत असलेल्या उल्हासनगर मनपा क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना 8 में पासून उल्हासनगरात "नो एंट्री" करण्याचा निर्णय घेतला आहे.

      गेल्या आठवड्यापर्यन्त उल्हासनगर शहरात कोरोनाची संख्या केवळ एक होती. सदर रुग्णही कोरोना मुक्त होऊन घरी परतला होता. मात्र मागील आठवड्यात उल्हासनगरात आढळलेल्या कोरोना रुग्णांत मुंबईत काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उल्हासनगर मनपा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आणि मुंबईत काम करण्यासाठी जात येत असलेल्या लोकांना येत्या 8 मे पासून मुंबईतच राहण्यास सांगण्यात आले आहे. 8 मे पासून त्यांना उल्हासनगरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढले आहे.