लॉक डाउन च्या काळात महाराष्ट्र सायबरने केले 201 गुन्हे दाखल

महाराष्ट्र
 15 Apr 2020  283

*लॉकडाऊनच्या काळात राज्यात २०१गुन्हे तर* 
*बीड जिल्ह्यात २६ गुन्हे दाखल*

लोकदूत वेबटीम 

मुंबई १५ एप्रिल 

 

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने राज्यात २०१तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २६ गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
      राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे.
      महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.  
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २०१ गुन्हे १४ एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत .
    त्यामध्ये सर्वाधिक २६गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले आहेत. कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ग्रामीण ११, मुंबई १०, सांगली १०,जालना ९, नाशिक ग्रामीण ८ ,सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ , ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ग्रामीण ५, सोलापूर शहर ३. नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
      या सर्व गुन्ह्यांचे  विश्लेषण असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ९९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ६६ गुन्हे दाखल करण्यात आले.   Titktok विडिओ शेअर प्रकरणी ३ तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ३७ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ३७ आरोपींना अटक केली आहे .
  *नवी मुंबई -कोपरखैरणे*
नवी मुंबई येथील कोपरखैरने ह्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एका अज्ञात इसमाने भारतीय झेंड्याचा अवमान करणारे छायाचित्र इंस्टाग्राम वर अपलोड करून भारत  देशाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्याबद्दल अज्ञात इसमा विरुद्ध कोपरखैरने  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*गैरफायदा* - *सावधानता बाळगा*
कोरोना महामारीच्या काळात सामान्यांनी  घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरायला, अडचण होऊ नये याकरिता सदर हफ्ते ३ महिन्यांसाठी स्थगित करण्याचे आवाहन भारतीय रिजर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना केले होते . काही सायबर गुन्हेगार सदर आवाहनाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. सामान्य लोकांना एक sms पाठवून सर्व बँक खात्याचे डिटेल्स म्हणजेच खाते क्रमांक ,डेबिट/क्रेडिट कार्डसचा तपशील व पिन नंबर इत्यादी एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावर पाठवायला सांगत आहेत . खातेदारकांनी सदर माहिती पाठविल्यावर   थोड्या वेळात एक OTP येतो व तो माहिती करून घेण्यासाठी एक कॉल येतो व समोरची व्यक्ती असे भासविते कि, सदर व्यक्ती त्या बँकेतील स्टाफच आहेत व तो OTP  घेतात . थोड्यावेळाने खातेदारकाला बँकेचा sms येतो कि त्याच्या खात्यातून काही रक्कम डेबिट होऊन दुसऱ्या कोणत्यातरी अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाली आहे. 
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना असे विनम्रपणे आवाहन करते कि जर असा काही माहिती मागणारा sms आला तर आपण आपली माहिती पाठवूं नये कारण तुमचे कर्ज असणाऱ्या बँकेकडे तुमचा सर्व तपशील आधीपासून उपलब्ध असतोच व असा sms आल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करून खातरजमा करावी .तसेच आपण जर चुकून असे फसविले गेले असाल तर आपल्या बँकेच्या हेल्पलाईन वर माहिती द्यावी.
 व पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करावी.तसेच या गुन्ह्याची नोंद www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर(website ) पण करावी असे आवाहन केले आहे.