....अन शीमा ने मारली बाजी

महाराष्ट्र
 13 Dec 2019  475


५९ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धत ठाणे विभागातून 'शीमा' नाटकाने मारली बाजी

मुंबई

लोकदूत वेबन्यूज टीम 

नोव्हेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ या स्पर्धेचा कालावधीत, ठाणे केंद्रातून एकूण २८ हून अधिक नाटके सादर झाली.  या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत
राहुल साळवे व वैभव सातपुते लिखित 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था, वाशी निर्मित आणि पारमिता फाउंडेशन संस्था सादर *'शीमा'* या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला . त्याचबरोबर अजून तीन विभागामध्येही शीमा या नाटकाने बाजी मारली आहे.

"#शीमा"  #समाजातल्या  '#ती' #ची  #कथा..!

पारमिता फाउंडेशन मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था निर्मित शीमा या दोन अंकी नाटकाचा आहे. ५९ व्या राज्य नाटयस्पर्धेच्या ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत शीमा नाटक सादर झाले होते.
"हे नाटक प्रेक्षकांना इतकं आवडलं की त्यांनी कलाकारांना नाटक झाल्यावर पुन्हा रंगमंचावर बोलावले.प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात सगळे प्रेक्षक या कलाकारांना दाद म्हणून उभे राहून टाळ्या वाजवत होते" हाच या कलाकृतीचा मोठा सन्मान होय अश्या भावना  प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.

शीमा हे नाटक आजच्या  समस्त स्त्री वर्गाच प्रतिनिधित्व करणाऱ नाटक आहे. आजच्या एकविसाव्या शतकातल्या भारतातल्या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांबद्दलची होणारी अवहेलना त्यांच्या बद्दलची मानसिकता, त्यांना अजूनही दिलेलं दुय्यम स्थान, चालीरीती रितीभाती च्या नावाखाली स्त्रियांस होणारे शोषण या भयानक समस्यांवर सीमा हे नाटक भाष्य करतं.एकंदरीत इथल्या व्यवस्थेने स्त्रियांच्या पायात टाकलेल्या बेड्या याची जाणीव सीमा हे नाटक समस्त स्त्री वर्गाला व पुरुष प्रधान संस्कृतीस करून देतं . स्त्री वर हक्क गाजवायचा अधिकार पुरुषाला कोणी दिला हा प्रश्न या नाटकातुन उपस्थित केला आहे. एखाद्या मुलीला येणारी " मासिक पाळी " ही तिच्या आयुष्यात नकळत किती बदल घडवून जाते . तीचा बालपणाचा प्रवास संपवून स्त्रित्वाकडे जाण्याचा प्रवास जो शिमातून मांडला आहे.हा प्रवास अतिशय भयाण आहे .
या नाटकाचे लेखन- राहुल साळवे ,वैभव सातपुते यांनी केले होते.दिग्दर्शन आणि नेपथ्य - वैभव पांडुरंग सातपुते यांनी केले होते.सुशील कांबळे यांनी संगीत,
 निलेश प्रभाकर यांनी प्रकाशयोजना,नितीन मोकल यांनी गीते व  प्रविण डोणे ,कविता राम, लतेष पुजारी यांनी गायन केले. तसेच जगदीश शेळके सर यांनी अतिशय उत्कृष्ट अशी रंगभूषा केली होती.
रंजना म्हाब्दी,मयूर साळवी,नितीन जाधव ,प्रमोद पगारे,सुशील शिर्के,शीतल जाधव, सुकेशनी कांबळे,अनिष बाबर व विजय इंगळे या कलाकारांनी यात काम केले आहे.
एखाद्या समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिला किती प्रगत आहेत ह्यानुसार ठरवतो " हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार मला प्रेरणादायी वाटतो आणि हा विचारच " शीमा " नाटक करण्यास मला प्रवृत्त करतो . राहुल साळवे आणि मी आमच्या संगनमताने ह्यावर चर्चा होऊन हे नाटक संहितेत उतरलं.आमचा हेतू कोणत्याही समाजाला दुखावण्याचा नाही.हा विषय प्रत्येकाच्या घरातला आहे आणि प्रत्येकाला तो आपलासा वाटावा ह्याची काळजी आम्ही घेतली आहे.दिग्दर्शक म्हणून संहीतेला न्याय देण्याच काम मी प्रामाणिक पणे केलं आहे . लोकांचा पहिल्याच प्रयोगाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे नाटकाचे दिग्दर्शक वैभव पांडुरंग सातपुते यांनी सांगितले.


सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळवून 
सर्वोत्कृष्ट नाटक प्रथम  - शीमा 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम  - वैभव पांडुरंग सातपुते 
सर्वोत्कृष्ट अभिनेता रौप्य पदक - मयूर साळवी 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रौप्य पदक - रंजना म्हाब्दी