आरक्षण प्रश्नी सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला -धनंजय मुंडे
महाराष्ट्र |
10 May 2019
353
|
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. त्यामुळे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. निवडणुकांच्या आश्वासनावर स्वार होताना सरकारने मराठा विद्यार्थ्यांचाही बळी दिला आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. मग त्यांच्या फसलेल्या योजना असोत किंवा नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले मात्र त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार आहे असा आरोप ही मुंडे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून आपली याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.