काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅपिंगप्रकरण;दोन वरीष्ठ अधिकार्यांची समिती गठीत

काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅपिंगप्रकरण;दोन वरीष्ठ अधिकार्यांची समिती गठीत
# सहा आठवड्यात अहवाल देणार
# गृहमंत्री अनिल देशमुख यांची यांची घोषणा
# हिंगणघाट अॅसिड हल्ला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल...
लोकदूत वेबन्युज
मुंबई ३ फेब्रुवारी
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन सत्ताधाऱ्यानी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचे फोन टॅप केले होते. याच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल सहा आठवडयात दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
या समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री कांत सिंग,एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरीष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. इस्रायल जे लोक गेले होते त्या सर्व गोष्टींची चौकशी करुन ६ आठवड्यात अहवाल देण्यात येणार आहे. यात जे अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्यांची चौकशी करण्यात येणार असून त्यांनी काय काय अभ्यास केला हेही या चौकशी समितीत तपासले जाणार आहे. त्याच बरोबर तेथून आणलेल्या स्वाफ्टवेअरचा कुठे वापर केला गेला याचीही चौकशी केली जाणार असल्याचे यावेळी गृहमंत्री यांनी सांगितले.
नागपाडा येथे शाहीनबागच्या धर्तीवर जे आंदोलन सुरु आहे ते बेकायदा आहे. त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आज संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली असून त्यातील लोकांनी भेट घेतली असून ते लवकरच आंदोलन मागे घेतील असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. वर्धा हिंगणघाट येथे महिलेवर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला झाला असून संबंधित आरोपीचे नाव समजले आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.